friendship status in marathi – नमस्कार मित्रांनो एखाद्यास आपली मैत्री भावना दर्शविण्याकरिता जर आपल्याला मैत्रीचे भाव सापडले . तर तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात.. मैत्री म्हणजे लोकांमधील परस्पर आपुलकीचे नाते. हे संघटनेपेक्षा परस्पर संबंधांचे एक मजबूत रूप आहे आणि संवाद, समाजशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्वज्ञान यासारख्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा अभ्यास केला गेला आहे.
Read More : friendship poems in marathi | मैत्री वर काही सुंदर कविता वाचण्यासाठी यावर क्लिक करा..
😎 ती वेडी म्हणते
.
माझ्यासाठी मित्रांना सोडुन दे ☹
.
.
“आता तिला कोण सांगणार
.
.
मित्र सोडले तर लग्नात काय हिचा बाप नाचणार😎
😁😂😂😂😂
Friends forever
”दोस्ती शिवाय मस्ती नाय”
☝😝😝😝😎😎😎😝😝😝
हे मनचं जणू वेड, एका नात्यांत गुंतलेल
ते नातं सुध्दा मैत्रीच्या धाग्यात विनलेलं,
जीवनांचे चार क्षण सार्यांनी मिळून जगायचं
थोड दु:ख झेलून, सार सुख इतरांना वाटायचं.

हे देवा मला माझासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्राना चांगली वहिनि भेटू दे..
प्रेम गमवावे लागले तरी चालेल …..
पण………..
आयुष्यात कधी
मैत्री गमवायची नाही..!!!
दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण
शमशान आहे…

हसलो मी तुझ्यासोबत अन रडतानाही तुझाच साथ होता
जगलो मी खुप…हातात माझ्या तुझ्या मैत्रिचा हात होता
🌿|| “मैत्री” ||🌿
ना सजवायची असते ,
ना गाजवायची असते ,
ती तर नुसती रुजवायची असते …!मैत्रीत ना जीव द्यायचा असतो , ना जीव घ्यायचा असतो ..,
इथे फक्त जीव लावायचा असतो …!!
हसतच कुणीतरी भेटत
असतं,नकळत
आपल्यापेक्षाही आपलसं वाटत
असतं, केंव्हा कोण जाणे मनात
घर करुन राहत असतं, ते
जोपर्यंतजवळ आहे
त्याला फूलासारखं जपायचं
असतं,दूर गेल्यावरही आठवण
म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव “मैत्री”असं
असत………
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे.

♥ “घड्याळा मध्ये तीन
काटे असतात, ते
तीनही काटे
एकमेकांना एका तासा मध्ये
फक्त एकदाच भेटतात
आणि ते सुद्धा फक्त
एका सेकंदा साठीच, पण
तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड
भेटी साठी हे काटे
एकमेकांना धरून राहिले
आहेत,
नाहीका ? ……………
आपली मैत्री अशीच आहे,
आपण एकमेकांना कधीतरीच
भेटतो, पण तरीही मनाने आपण
एकमेकांना धरून
राहिलो आहोत” ………. ♥
त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड
आठवणीसाठी ♥
हळूहळू वय निघून जातं, जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं
कधी कुणाची आठवण खूप सतावते, कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते
किनाऱ्यावर सागराचा खजाना नाही येत, जीवनात पुन्हा जुने मित्र नाही येत
जागा या क्षणांना हसून मित्रांनो, पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत.
हजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची
अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची
तीतकीच मैञी कर माझ्याशी
पण ओढ असुदे सात जन्माची

●☘🌺‼ मैत्री ‼🌺☘●
………………….🌹………………….
पानाच्या हालचाली साठी,
वारं हवं असतं …
मन जुळण्या साठी,
नातं हवं असतं …
एक सुंदर नात्यासाठी,
विश्वास हवा असतो …
त्या विश्वासाची पहिली,
पायरी म्हणजे?
” मैञी “
मैञीचं नातं कसं,
जगावेगळं असतं …
रक्ताचं नसलं तरीही,
मोलाचं असतं …
………………….🌹…………………
हजारो तारकांच्या मधे एखादा तरी ध्रुव सारखा असावा ..
प्रत्येक फुलाचा गंध निशीगंधा प्रमाने मंद असावा ..
जिवनाचा प्रवास कीतीही संकटांनी भरलेला असो ..
सोबत फक्त तुझ्या मैञीचा आधार असावा .. !!
‘गुण जुळले’की लग्न होतात दोष जुळले……की……. मैत्री

साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिंहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
“तुमच्यासाठी काय पण”

स्वप्न नसलेल्या
डोळ्यांचा मी..
गाव नसलेल्या
वाटेचा मी..
न उजाडनार्या
दिवसाचा मी.
Read More : friendship poems in marathi | मैत्री वर काही सुंदर कविता वाचण्यासाठी यावर क्लिक करा..
१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी हझर असताना तू आलीस कशाला?
ठेव्हा मैत्री म्हणाली,
“जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”
ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र…
ह्या भावना त्याच आहेत
जणु नात्यातुन भावलेल्या,
त्या ओळी त्याच आहेत
तुझ्या मैत्रीने सुचलेल्या
स्वतः प्रेक्षा माझी
जास्त काळजी घेऊन
मला प्रेरक अन,
उत्साही बनवणाऱ्या
तुझ्या मैत्रीचा आधार अतुलनीय आहे.

स्पर्श प्रेमाचा झाला जरि मज
तूला न भूलण्याची देतो मी खात्री
कारण यालाच म्हणतात मित्रा
जिवलग मित्रांची घनिष्ठ मैत्री………….
स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.
सोबतीला कुणी नसेल तर,
मुके मित्रही बोलके होतात.
स्पर्शातून आणि नजरेतून,
व्यथांचे भार हलके होतात.
सुरांची साथ आहे ,
म्हणुन
ओठांवर गीत आहे ,
भावनांची गुंफण आहे ,
म्हणुन
प्रेमाची प्रीत आहे ,
दुर असुनही जवळ असण ,
हिच आपल्या ” मैञीची ” जित आहे ..!!

सुखदु:खात सामील होशी
फळे गोमटी वाटून खाशी
पूरक परस्परांना असशी
भांडशी फिरुनी गळे भेटशी
येशी धावूनी मदतीला दिवसा वा रात्री
धन्य जाहलो लाभली तुझी निरागस मैत्री
सागराचे पाणी कधी
आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही ,
एक जन्म काय हजार जन्म झाले
तरी ,तुझीआणि माझी
मैञी कधीच तुटणार
नाही.||
सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.
समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला,
मी शेवाळ नाही,
असं ही नाही,
संकटात साथ सोडून पाळणारा,
मी आहे दीप स्वतः जळून
इतरांना प्रकाश देणारा…

सतत जीवनात तुझी आणि माझी
मैत्री अशीच सतत फुलू दे,
कधीकाळी काही दोष माझा तरी
त्यात तुझ्या मायेचा गोडवा राहू दे
सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू
कोणत्याही
दुकानात मिळत
नाही किंवा पृथ्वीच्या
गर्भातूनही नाही …
…….तर मिळते
मित्र्याच्या हृदयात
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…

शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे इमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,…
कारण आमचे मित्रच “लय भारी”
शब्दांशी मैत्री असावी,
म्हणजे हवं तसं जगता येतं.
जग रडत असलं बाहेर,
तरी एकट्याला हसता येतं

शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्री
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकतो तुला खात्री
शब्दांना भावरूप देते तेच खरे पत्र
नात्यांना जोडून ठेवते तेच खरे गोत्र
नजरे पाड्याल पाहू शकतात तेच खरे नेत्र
दूर असूनही दुरावत नाहीत तेच खरे मित्र
शत्रूला हजार संधी द्या मित्र बनण्यासाठी
पण मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू बनण्यासाठी

शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय…
वेड्या मित्राची प्रीत कधी
कळलीच नाही तुला
तुझ्या प्रीतीची छाया कधी
मिळालीच नाही मला.
विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते
क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते
क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते
आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते..

लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात, तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो..”
रोजच आठवण यावी, असे काही नाही
रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही ..।
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात..
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात …॥
रोज आठवण न
यावी असे होतच नाही..
रोज भेट घ्यावी यालाही
काहीच हरकत नाही..
मी तुला विसरणार नाही
याला “विश्वास” म्हणतात
आणि..
तुला याची खात्री आहे यालाच
“मैत्री” म्हणतात..

रिकाम्या आभाळातच चांदण्यांची जोडी असते,
फरक एवढाच ती आपणास दिसत नसते.
सागरामधील शिंपल्यातही एक मोती असतो,
जो सहज कोणालाही मिळत नसतो,
तशीच हि मैत्री असते जी जीवनात सगळ्यांच्याच येते
पण तिची ओढ सगळ्यानाच नसते…….
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला
रात्रीनंतर उगवते म्हणून ती पाहत असते,
वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते
कलेकलेने बदलतो म्हणून तो चंद्र असतो,
भरती ओहटीत भडकतो म्हणून तो समुद्र असतो
क्षिताजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते,
आसवांनी जोडले जाते म्हणून ते प्रेम असते
क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते,
सुखदुःखाची देवाणघेवाण असते म्हणून ती मैत्री असते

येणारे येतात अन जाणारे जातातही…
मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते …
करायची ठरवली तरी ती करता येत नाही
रक्ताच्या नात्यापासून
कित्येक दूर असलेलं नातं,
त्याचा काहीच संबंध नाही त्या नात्यांशी,
त्यातील राग,रुसवे,भाव-भावना
प्रेम सारं काही सेम
पण रक्ताचा काहीच संबंध नाही,
म्हणजे नातं कस असावं
हे मैत्री खुप चांगलं पटवून देते,
काय असते मैत्री
खरतर खुप सोप्पी असते ती
रक्ताच्या खुप पुढचा हिशेब मांडते ती
काहीतरी विणते ती दोघांमध्ये, दोघींमध्ये,
जे दिसत मात्र नाही पण असतं…
वयाचं बंधन ही नाही,
म्हणजे काही नाती जन्म झाल्यापासून चिकटुन जातात आपल्यासोबत,
पण यांचं खुप वेगळ आहे
जेव्हा कळू लागतं तेव्हा ही नाती जवळ येवू लागतात,
आणि फ़क्त वाढतच जातात
अगदी शेवटच्या क्षणांपर्यन्त ….
म्हणजे आपली नाती दूर होऊ शकतात …. नाही होतातच, याची वेगळी उदाहरण द्यायला नकोत,
पण मैत्री कधीच नाही वेगळी होत,
आग द्यायला त्याचा मुलगा नसेलही कदाचित पण खरे मित्र मात्र तिथे असतील त्या ही क्षणी,
अशी असते मैत्री
जी शब्दांमध्ये बांधून ही नाही ठेवता यायची ….
अशी असते मैत्री
अशी असते मैत्री……

रक्ताची नाती जन्माने मिळतात. मानलेली नाती मनाने जुळतात. पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.