लाखो कोकणकर वेग वेगळ्या कारणास्तव मुंबई पुणे किंवा भारतभर तसेच इतर देशात हि राहायला गेले आहेत.परंतु माणूस कितीही आणि कोणत्याहि ठिकाणी गेला तरी त्याची जन्मभूमीशी नाळ जोडलेली असतेच.
त्याच्या आठवणीत त्याचे गावचे लहानपणीचे प्रसंग त्याच्या आठवान तो कधी विसरत नाही. अश्याच २० एक आठवणींची यादी तुमच्या साठी घेऊन आलोय. यातले कोणते प्रसंग तुम्ही अनुभवले आहेत आणि कोणते प्रसंग तुमच्या आठवणींचा हिंसा आहेत. हे कंमेंट करून करून आम्हला नक्की पाठवा, तसेच हे आठवणी आपल्या मित्र परिवाराला पाठवायला विसरू नका.
खाली कोकणी जीवनातील काही वैशिष्ठ्यपूर्ण व आनंददायी अनुभवांची यादी दिली आहे. या यादीला चेकलिस्ट मानून आपण यातले काय अनुभवले आहे ते तुम्ही स्वत:च ठरवा.
माझे कोकण …………..
१) कधी झाडावर चढून आवळे, चिंचा,पेरू जांभळे,ओवळे (बकुळफळे) काढून खाल्ली आहात काय ?
२)गाभुळलेल्या चिंचेच्या स्वर्गीय चवीचा आनंद घेतलात काय ?
३)शाळेत जाता, येताना तोरणे, करवंदे, कणेर, खाल्ली आहेत काय ?
४) विविध चवीचे रायवळ आंबे चाखले आहेत काय ?
५)दगडावर ओली काजू बी घासून, पायाच्या टाचेने आतील काजूगर काढून व तो डोक्यावर पुसून खाल्ला आहे काय ?
६) फणसाच्या झाडाच्या फांदीवर बसून झाडपिक्या फणसातील गरे खाल्लेत काय ?
६)काटेर्या अळूच्या झाडावरील अळू काढून ते राखेत पिकायला ठेवून नंतर मित्रांसोबत त्यांचा स्वाद घेतलात काय ?
७)भाजीच्या फडातील काकड्या, चिबूड रात्रीच्या वेळी गुपचूप काढून खाल्ले आहेत काय ?
८) पर्यात, ओढ्यात (व्हाळात) मासे पकडून ते कुंभ्याच्या पानात बांधून तयार केलेला व निखार्यात भाजलेला ‘मोटला’खाल्ला आहे काय ?
९) कांडाळ, इंद, खोईण वापरून नदीतील मासे, किर्व्या (कुर्ल्या) पकडल्या आहेत काय ?
१०) मेणे घालून नदीतील मासे पकडले आहेत काय ?
११) तुलशीच्या लग्नाच्या दुसर्या दिवशी पारंपारिक वाघबारसेच्या कार्यक्रमात भाग घेऊन मित्रांसोबत नदीकाठी जेवला आहात काय ?
१२)करांदे, घोरकंद, शेवरकंद, काटेकणगर यांचा चुलीत भाजून आस्वाद घेतलात काय ?
१३) डागोळीच्या माशाची बोटी पाणचुलीत भाजून ती भाकरीबरोबर खाल्लीत काय ?
१४) कोंबडा कापल्यानंतर त्याचे काळीज व गांजा, चुलीत भाजून (त्याला लागलेल्या राखेसहीत व कोळशांच्या कणांसह)खाल्लेत काय ?
१५)गावठी पोह्यानीे भरलेल्या बशीत चहा ओतून ते खाल्लेत काय ?
१६)आंब्याच्या झाडावरून वार्याने पडणारे आंबे चपळपणे धाऊन जाऊन व जमवून झाडाखालच्या घरगुटल्यात ठेवलेत काय ?
१६)अनवाणी पायाने माळावर फुललेल्या कोचावरून कौशल्याने धावलात काय ?
१७)चिव्यापासून फिटनळी बनवून तिच्यात चिरफळे किंवा अळूच्या पानांचा गोळा भरून उडवलेत काय ?
१७)मे महिन्याच्या सुट्टीत नदीवर वायंगणी शेतीसाठी बांधलेल्या घरणात मनसोक्त डुंबलात काय ?
१८)गावात झालेल्या नमनात (खेळे) सुरूवातीपासून बसून असंख्य गुदमरवणार्या वासांचा मुकाबला करून रावणाची पाटी नाचेपर्यंत जागलात काय ?
१९)गुराना पाणी पाजायला नेताना कधी रेड्याच्या किंवा म्हैशीच्या पाठीवर बसून अनुभव घेतलात काय ?
२०) खळ्यात नाचणी, हरीक यांच्या मळणीत काम केलेत काय ?
२१)अंगणातील किंवा खळ्यातील माती खणून नंतर ती चोपण्याने चोपलीत काय ?
२२)बिरंबोळे खणून काढून खाल्लेत काय ?
२३) गोमेटे खाल्लेत काय ?
२४)कधी कातभट्टीवर तिखट जेवण जेवलात काय ?
२५) कधी चांदण्यातून बैलगाडीत झोपून प्रवासाचा आनंद घेतलात काय ?
२६)कधी अडीत घातलेले गरमागरम, रसदार रायवळ आंबे चाखलेत काय ?
२७)चुलीत काजू खमंग भाजून त्यांचे गर खाललेत काय ? फणसाच्या अठल्या चुलीत भाजून खाल्ल्यात काय ?
२८)अबयची बी दगडावर घासून तिचा चटका मित्राच्या मांडीला दिलात काय ?
२९)सागाची पाने चिव्याच्या काठीवर लावून त्यांची छत्री बनवलीत काय ?
३०)कधी इरले डोक्यावर घेऊन किंवा घोंगडी डोक्यावर घेऊन जोरदार पावसातून चाललात काय ?
३१)पिरस्यावर वाळत घातलेल्या घोंगडीतून निघणारा वास अनुभवलात काय ?
३२)कधी गावपारधीला गेलात काय ?
३३)बालपणात पँटच्या खिशात पोहे व हाताच्या मनगटावर गूळ चिकटवून गावात फेरफटका मारलात काय ?
३४)माळावर फासक्या लावून कवडे, ल्हावे पकडलेत काय ?
३६) शिमग्यातून पालखी नाचवलीत काय ?
३७)घरातील कोंबडीला घार, कोल्हा मुंगूस पकडून नेत असताना तुम्ही पाठलाग करून तिला सोडवलेत काय ?
प्रश्नपत्रिका मोठी आहे. तरी वरील प्रश्नांपैकी तुमची ५० % उत्तरे जरी “होय” अशी आली तरी तुम्ही कोकणातील खरे जीवन जगलात असे म्हणता येईल !
चला प्रश्नपत्रिका सोडवा ! इथे कॉपी करण्याला संधीच नाही, कारण हे खरे कोकणातील जीवन जगणे आहे.